मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळा

(नवी मुंबई)- चित्रपट निर्मिती या क्षेत्रात तरुण वर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होत आहे, परंतु त्यांना असलेल्या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांची दिशाभूल केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन अनघा इव्हेंट्स व सिनेबझ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स च्या वतीने तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक इम्तियाज हुसैन, प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर तसेच दिग्दर्शक मिलिंद कवडे, आणि दिग्दर्शक रमेश भटनागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.ही कार्यशाळा दिनांक २२, २३ आणि २४ जुलै २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत चित्रपट निर्मितीत ज्यांना आवड आहे त्यांना सहभाग घेता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. ही कार्यशाळा सिनेबझ अकॅडमी, योग विद्या निकेतन, वाशी डेपो जवळ, सेक्टर ९ (अ), वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत असून इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . २२ जुलै रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन होईल तसेच या दिवशी मिलिंद क

आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी

तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्र

आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी

तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्र

अभिनेता भारत गणेशपुरे यांना "विदर्भ आयकॉन" पुरस्कार

(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु

मुंबई सानपाडा येथे स्वस्त दरात एलईडी बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन

मुंबई, सानपाडा - प्रभाग ७७,७८ मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामधे LED बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सानपाडा विभागातील सेक्टर १,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२० मधील विभागात मोठमोठ्या उंच इमरती आहेत. म्हणून विजेची बचत ही घराघरामधे व्हावी या उद्देशाने दिनांक १८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०१५ पर्यन्त बुद्धेश्वर मंदिर, सानपाडा येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वजे पर्यन्त नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा म्हणून श्री. दशरथ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयादशमीच्या मुहुर्तावर ४ लेड बल्ब वर १०० रुपयांची विशेष सूट असणार आहे. हे LED बल्ब केंद्रावर खरेदी करते वेळी आपण आपले ओळखपत्र आणि लाइटबिलची छायांकित प्रत सोबत बाळगणे गरजेचे आहे. यावेळी श्री. दशरथ भगत, अध्यक्ष - नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस, निशांत भगत,अध्यक्ष- ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका रूपाली भगत तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई होणारच – संजय भाटिया

नवी मुंबई, ता. ८ एप्रिल - नवी मुंबईतील ९५ गावठाणांच्या आसपासची अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडणे सिडकोला बंधनकारक असल्याने अशा १६५७ बांधकामाविरूध्दची कारवाई सिडको लवकरात लवकर करील अशी स्पष्ट ग्वाही सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांनी आज दिली. जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री. भाटिया बोलत होते. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे त्यांच्या सततच्या मागणीनुसार नियमित करण्यासाठी समूह विकास योजनेद्वारे गावठाणांचा पुनर्विकास करण्याबाबतची अधिसूचना २०१४ मध्ये शासनाने प्रसिध्द केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सूचनांचा विचार करून शासनाने सुधारित योजना तयार केली. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बांधकामांना ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मार्च २०१५ रोजी विधिमंडळात केली होती. सर्व १६५७ अनधिकृत बांधकामे १ जानेवारी २०१३ नंतर बांधण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अशी १०२१ बांधकामे आहेत तर सिडकोच्या क्षेत्

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार

मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.